फडणवीसांचा चेहरा पडला, मी विचारलं देवेंद्रजी काय झालं? शिंदेंनी सांगितला ४५ दिवस जुना किस्सा
[ad_1]
एकनाथ शिंदे यांच्या साथीने सत्ता स्थापन केल्यानंतर देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री होणार, अशी अटकळ राजकीय वर्तुळासह सर्वसामान्य नागरिकांनीही बांधली होती. मात्र अचानक फडणवीसांनी शिंदेंना सीएम करण्याची घोषणा करत मोठा धक्का दिला होता. त्या पत्रकार परिषदेत आपण मंत्रिमंडळाच्या बाहेर राहून देखरेख करणार असल्याचं फडणवीसांनी सांगितलं होतं. मात्र अचानक पक्षश्रेष्ठींचे आदेश आले, आणि फडणवीसांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यावी लागली. एकदा मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसलेल्या देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्रिपद सांभाळावं लागणं, हे डिमोशन असल्याचीही चर्चा रंगली होती.
हेही वाचा : मला साहेबांच्या अंत्यसंस्काराला जाऊ द्या, त्यांचं दर्शन घेऊ द्या, मेटेंच्या ड्रायव्हरने टाहो फोडला
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांना राज्याचे उपमुख्यमंत्रिपद दिले जात असल्याचे ऐकून मला स्वतःलाच आश्चर्य वाटले होते. म्हणजे यापूर्वी मुख्यमंत्रिपदावर काम केलेल्या व्यक्तीला उपमुख्यमंत्री कसे केले जाऊ शकते? असा प्रश्न मला पडला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदासाठी माझ्या नावाची घोषणा केली, तेव्हा ते आनंदी दिसत होते. पण पक्षाने त्यांना उपमुख्यमंत्री होण्यास सांगितल्यावर ते काहीसे अस्वस्थ झाल्याचे दिसलेले. त्यानंतर मी त्यांच्याशी या विषयावर चर्चाही केली. त्यावर त्यांनी, पक्षाने वरुन आदेश दिला आहे, तो मान्य करावा लागेल, असे सांगितले होते.
२०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद वाटून घेण्याचे आश्वासन कधीच दिले नव्हते, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. त्याचवेळी, जो सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला तोच मुख्यमंत्री होणार का? एक सामान्य कार्यकर्ता मुख्यमंत्री होऊ शकत नाही का? असा बोचरा सवाल शिंदेंनी उद्धव ठाकरेंना केला.
हेही वाचा : ‘स्वातंत्र्याची १०० वर्षे पूर्ण होतील, तेव्हा आदित्य ठाकरे झेंडावंदन करायला दिल्लीतून इकडे येतील’
ठाण्यातील काशिनाथ घाणेकर सभागृहात एकनाथ शिंदे यांचा जाहीर सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी ते बोलत होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत जनतेने भाजप-शिवसेना युतीला बहुमत दिले होते, त्यामुळे अडीच वर्षांपूर्वीच त्यांनी हे पाऊल उचलायला हवे होते, असे सांगून शिंदे यांनी बंडखोरीचे उचललेले पाऊल योग्यच असल्याचे म्हटले आहे.
हेही वाचा : Vande Mataram : ना ‘हॅलो’ बोलणार, ना ‘वंदे मातरम्’, भुजबळांनी ठरवलं फोन उचलताच काय बोलायचं
[ad_2]
Source link