Shivjayanti 2022: शिवज्योत आणण्यासाठी रायगडाकडे निघालेल्या तरुणांचा अपघात; मोटारसायकल २०० फूट दरीत कोसळली

[ad_1]
केतन देसाई (वय २३), प्रथमेश गरुड (वय २५) आणि किरण सुर्यवंशी (वय २०), अशी या तीन तरुणांची नावे आहेत. हे सर्वजण भोरच्या भोंगवली तालुक्यातील रहिवासी आहेत. त्यापैकी दोघांवर महाडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असुन एकाला प्रथमोपचार करून घरी पाठविण्यात आले. महाड औद्योगिक वसाहत पोलिस आणि स्थानिक नागरिकांनी बचावकार्य करीत जखमींचे प्राण वाचवले. आज महाराष्ट्रात सगळीकडे शिवजयंती अगदी मोठ्या उत्साहात सुरू आहे. पण अशा घटना घडत असल्यामुळे अनेक ठिकाणी शिवजयंतीच्या ठिकाणी दु:ख व्यक्त कऱण्यात येत आहे. कालपासून महाराष्ट्रात अशा अनेक दुर्देवी घटना घडल्या आहेत.
शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण सुरू असतानाच स्टेज कोसळला अन्…
देशातील सर्वाधिक उंचीच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे शुक्रवारी रात्री औरंगाबादमध्ये मोठ्या जल्लोषात अनावरण करण्यात आले. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी शिवप्रेमींसह औरंगाबादकरांनी मोठी गर्दी केली होती. मात्र अनावरणाचा कार्यक्रम सुरू असतानाच मीडियासाठी तयार करण्यात आलेला स्टेज अचानक कोसळला. पण यावेळी पत्रकारांच्या समयसूचकतेमुळे तीन लहान मुलांचा जीव थोडक्यात बचावला.
औरंगाबादमधील हा पुतळा शिवरायांचा देशातील सर्वाधिक उंच पुतळा आहे. पुतळ्याची २१ फुट उंची आहे, पुतळ्याचे वजन ७ मेट्रीक टन आहे, पुतळ्यासाठी ब्राँझ धातु वापरण्यात आलेला आहे, पुतळ्याच्या चौथाऱ्याची उंची ३१ फुट आहे, चौथाऱ्यासह पुतळ्याची एकूण उंची ५२ फुट, चौथाऱ्याचे बांधकाम आर. सी. सी. मध्ये असुन चौथाऱ्या भोवती स्टोन क्लॅडींग करण्यात आले आहे, चौथाऱ्याभोवतीच्या २४ कमानीत २४ मावळ्यांच्या प्रतिकृती बसविण्यात आलेल्या आहेत. चौथाऱ्याभोवती कारंजे तयार करण्यात आलेले आहे. हा अश्वारूढ पुतळा तयार करण्यासाठी एकूण ९८ लाख रुपयांचा खर्च आला असून, चौथाऱ्याच्या बांधकामासाठी २५५ लाख रुपयांचा खर्च आला आहे.
[ad_2]
Source link